मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला अटक करण्यात आली आहे. मिहीरच्या आई आणि बहीण यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. आज माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. वरळी कोळीवाड्यातील घरी जाऊन आदित्य ठाकरेंनी सदर अपघातामधील मृत महिलेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“माझ्याकडे शब्द नाही. त्यांना भेटल्यानंतर मन हेलावून जाते. अपघात होता असं सांगतात पण ही हत्याच आहे. कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या मनातला राग दुःख आहे सर्व दिसते, एवढी भयानक गोष्ट मुंबई महाराष्ट्रात होऊ शकते, नरकातून राक्षस आला तरी असं करू शकणार नाही. त्यांना नुकसान भरपाई नको आहे. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1